Crime 24 Tass

हनुमान चालिसा वाद : नवनीत आणि रवी राणा यांना दिलासा नाही, आता २९ एप्रिलला याचिकेवर सुनावणी

मुंबई – हनुमान चालीसा वाद प्रकरणी अटकेत असलेले राणा दाम्पत्याला मुंबईतील सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या दोघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती, पण न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली.आता या प्रकरणावर २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या वादानंतर राणा दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्यावर आयपीसीच्या कलम 15ए आणि 353 तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्वात मोठे कलम 124A म्हणजेच देशद्रोहाचे कलमही लागू करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती ही याचिका
यापूर्वी नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची याचिका फेटाळून लावली होती. सार्वजनिक ठिकाणी हनुमान चालीसा पठण केल्याबद्दल नवनीत राणा यांना फटकारले होते. सार्वजनिक जीवनात ज्यांची जबाबदारी असते, त्यांच्यावर अधिक जबाबदारी असते, असे न्यायालयाने म्हटले होते.

राणा दाम्पत्याची कानउघडणी करत मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली !

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]